PMFBY 2026 : प्रधानमंत्री पिक विमा खरीप हंगाम २०२६ अर्ज सादर करण्यास सुरुवात...

Mahendra Vasave
0

Fasal-bima-yojana

PMFBY 2026


महाराष्ट्रात अतिवृष्टी, अवकाळी पाऊस व दुष्काळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.  पिक विमा योजना अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना फायद्याची ठरली आहे. सध्या खरीप हंगाम सुरू झाला असून, खरीप हंगामातील पिकांना "प्रधानमंत्री पीक विमा" योजनेअंतर्गत संरक्षण मिळणार आहेत

PMFBY अंतर्गत "खरीप हंगाम २०२६" साठी ऑनलाईन अर्ज भरणे सुरू झाले असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा. दिनांक : १ जुलै २०२६ पासून ते दिनांक : ३१ जुलै २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी सी. एस. सी. (CSC), वेबसाईट (Website) किंवा ऍप (App) द्वारे आपला अर्ज ऑनलाईन सादर करू शकेल.

● पात्रता : प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत अर्ज सादर करण्यासाठी खालील सर्व शेतकरी पात्र असणार आहेत.

१. कर्जदार.
२. बिगर कर्जदार.
३. भाडेपट्टीवर शेती करणारे शेतकरी.

● संरक्षित बाबी : पिक विमा योजनेअंतर्गत अर्ज सादर केलेल्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पिक विमा मोबदल्याची ठरवण्यात आलेल्या विमा संरक्षित बाबी पुढील प्रमाणे -

१. नैसर्गिक आपत्तीपासून अधिसूचित क्षेत्र पातळीवर विमा संरक्षण, नुकसान भरपाई राज्य शासनाद्वारे केलेल्या पीक कापणी प्रयोगाच्या आधारित.

२. चालू वर्षाचे सरासरी उत्पन्न उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी नोंदले गेल्यास नुकसान भरपाई देय.

३. पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, काढणी पश्चात नुकसान, अधिसूचित स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसानीस संरक्षण.

टीप : कुळाने अगर भाडेपट्टीकराराने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी विमा करतेवेळी नोंदणीकृत केलेल्या भाडेपट्टीकरार अपलोड करणे बंधनकारक.

● नुकसानीची कारणे : प्रतिकूल परिस्थितीमुळे पेरणी, उगवण न होणे, पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे नुकसान. क्षेत्र पातळीवर हंगामाच्या शेवटी देय नुकसान भरपाई - पिक पेरणी पासून ते काढणी पर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड रोगराई इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट.

अधिसूचित स्थानिक नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे होणारे नुकसानीस वैयक्तीक पातळीवर विमा संरक्षण गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी किंवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक अधिसूचित नैसर्गिक आपत्ती झाल्यामुळे होणारे अनुसूचित पिकांचे ठराविक क्षेत्रातील नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येईल.

● काढणी पश्चात नुकसान : ज्या पिकांची काढणी नंतर शेतात पसरवून अथवा पेंढ्या बांधून सूकवणी करणे आवश्यक असते, अशा कापणी किंवा काढणी नंतर सूकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अनुसूचित पिकांचे काढणी नंतर दोन आठवड्याच्या आत (१४ दिवस) गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगर मोसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निकषांचे अधीन राहून नुकसान भरपाई निश्चित केली जाईल.

अनुसूचित स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसानीची सूचना ७२ तासाच्या आत क्रॉप इन्शुरन्स ॲप, विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक ,सबंधित बँक किंवा कृषी विभाग द्वारे द्यावी. PMFBY

● सहभाग प्रक्रिया :- प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहभागाची दोन पद्धत असून, कर्जदार शेतकरी व बिगर कर्जदार शेतकरी ह्यांची विस्तृत माहिती पुढीलप्रमाणे -

१. कर्जदार शेतकरी :- प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. तथापि कर्जदार शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा करावयाचा नसेल त्यांनी योजनेत सहभागाच्या अंतिम तारखेपूर्वी संबंधित बँक शाखेत विहित नमुन्यातील घोषणापत्र भरून देणे आवश्यक आहे. अन्यथा त्याच्या अनुसूचित पिकांचा विमा संबंधित बँकेमार्फत करण्यात येईल.

त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी मागील हंगामात आपल्या पिकांचा विमा न करणेबाबत घोषणापत्र आपल्या बँक शाखेत दिले असल्यास, चालू हंगामात विमा करण्यासाठी विहित नमुन्यातील घोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे.

२. बिगर कर्जदार शेतकरी (ऐच्चिक) :- बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील विमा प्रस्ताव पत्रक पूर्णतः भरून आधार कार्ड, बँक पासबुक व विमा हप्त्याची रक्कम आपले बँक खाते असलेल्या बँक शाखेत अंतिम मुदतीपूर्वी जमा करणे. अधिक वाचा...

Click to More... 👉🏻

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !